मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी अपात्र आमदारांवरील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्षांकडून १६ अपात्र आमदारांबाबच्या याचिकेवर निर्णय घेण्यास दिरंगाई केली जात असल्याचं म्हणत ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज ठाकरे गटाकडून वकिल कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात युक्तिवाद केला.
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, दिवाळीनंतर निकाल लागणार ?
आमदार अपात्रतेप्रकरणी आता अध्यक्षांना सर्वोच्च न्यायाकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. सध्याचे वेळापत्रक मान्य नसल्याचं सांगत नवीन वेळापत्रक देण्यासाठी ३० ऑक्टोंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या सुट्टीनंतर ३० ऑक्टोंबरला पुढची सुनावणी होणार आहे. अध्यक्षांनी नीट वेळापत्रक दिले नाही तर आम्ही वेळापत्रक ठरवू असे कोर्टाने म्हटलं आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांना माध्यमांशी न बोलण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे,” मनोज जरांगे पाटलांची मागणी
आता विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आली आहे.ते बाहेर जाऊन मुलाखत देत आहेत. अध्यक्ष म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं काम करावं. असं कोर्टाने म्हटलं आहे. तर विधानसभा अध्यक्षांसोबत बसण्याचे निर्देश होते पण मी बसू शकलो नाही. त्यामुळे आम्ही वेळपत्रकात बदल करू शकलो नाही. काही याचिका आता दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षांना वेळ लागेल असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राहुल नार्वेकर चोरांना सरंक्षण देताहेत, त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात..,” राऊतांचा जोरदार घणाघात
शिवसेना १६ अपात्र आमदारांच्याबाबत जुलै, सप्टेंबरमध्येच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फक्त वेळकाढूपणा केला आहे. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. तर ११ मे नंतर विधानसभा अध्यक्षांनी काहीही केलं नाही. सुधारीत वेळापत्रक न दिल्याने आज आम्ही तुम्हाला वेळापत्रक काढण्यासाठी आदेश देऊ असं कोर्टाने म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेसंदर्भात लवकर निर्णय घेण्यात यावे, त्यानंतर राष्ट्रवादीचीही सुनावणी घ्यावी लागणार आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आधी निर्णय घ्यावे लागेल. असं सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी म्हटले आहे. सर्वपक्षांसोबत बैठक घेऊन वेळापत्रक काढण्याची अपेक्षा होती. असंही कोर्टाने म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नाही तर वेळापत्रक काढण्याचा आम्ही आदेश देऊ शकतो”, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत दिला इशारा
हेही वाचा…“समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय”, वाचा सविस्तर
हेही वाचा…मराठा आरक्षणावर विखे पाटलांचा तिखट वार, जरांगे पाटलांच्या ‘त्या’ भूमिकेवर घेतला आक्षेप
हेही वाचा…“ठाणे कुणाचा गड? निवडणुका लागल्यानंतर कळेल,” राजन विचारेंनी शिंदेंना दिले आवाहन
हेही वाचा…“पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले”, एकनाथ शिंदे