ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली. तर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर भगवाच फडकला जाईल. असं ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं. यातच आता ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली जाणार असून कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत उमेदवाराची चाचपणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यातच आता राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन दिलंय.
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालय आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार
कुणाच्याही नावावर ठाणे जिल्हा नसून हा शिवसेनेचा गड आहे. पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यांनी शिवसेनेला सत्ता दिली आहे. हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून याठिकाणी काम केलं जात आहे. निवडणुका लागल्यानंतर ठाणे जिल्हा कुणाचा गड आहे ते माहिती पडेल. असा थेट आवाहन राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले
दरम्यान, अलिकडेच झालेल्या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना आदेश दिले आहेत. तसेच आपला पक्ष तळागाळात पोहाचयला हवे, प्रत्येक ठिकाणी आपलाच उमेदवारी विजयी झाला पाहिजे. असं देखील उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निक्ष्शून सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, दिवाळीनंतर निकाल लागणार ?
हेही वाचा…“नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे,” मनोज जरांगे पाटलांची मागणी
हेही वाचा…“राहुल नार्वेकर चोरांना सरंक्षण देताहेत, त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात..,” राऊतांचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर, चंद्रकांत पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश”, हेमंत रासने