जालना : मराठा आरक्षणाच्याबाबत मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर दुसऱ्या बाजूला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून ओबीसी नेत्यांनी याचा विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटलांनी आपला पुन्हा महाराष्ट्र दौरा घोषित केला आहे.
हेही वाचा…“आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती?, SIT चौकशी लावा,” पंकजा मुंडेंची मागणी
मनोज जरांगे पाटील येत्या १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरूवात करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार असून एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे पाटील हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. यातच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे.
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय
कसा असेल हा महाराष्ट्र दौरा?
15 नोव्हेंबर वाशी, परांडा करमाळा,16 नोव्हेंबर दौंड, मायनी, 17 नोव्हेंबर सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड, 18 नोव्हेंबर सातारा, वाई, रायगड, 19 नोव्हेंबर रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी, 20 नोव्हेंबर तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा, 21 नोव्हेंबर ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, 22 नोव्हेंबर विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, 23 नोव्हेंबर नेवासा, शेवगाव, बोधगाव.
READ ALSO :
हेही वाचा…“नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटला, नाशिकच्या शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात याचिका”
हेही वाचा…नांदेडचे ‘हे’ पिता-पुत्र शिंदे गटात दाखल, शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश प्रवेश
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका”, तानाजी सावंतांना मनोज जरांगे पाटलांनी खडसावलं
हेही वाचा…“ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय आमचाच समजून भाजपने फटाके फोडले तर…” राष्ट्रवादीने भाजपला दिला इशारा