मुंबई : देशाची राजधानी दिल्ली बरोबर आता मुंबईत देखील हव्याच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी दिवाळीत शक्यतो फटाके फोडू नका असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“ना देवेंद्र फडणवीस ना अजित पवार,” कार्तिकी एकदशीला विठ्ठालाची शासकीय पुजा कोण करणार?
ज्यांना आनंद वाटतो त्यांनी फटाके फोडावे परंतु जास्त धुवा आणि जास्त आवाज करणारे फटाके फोडू नयेत. फटाके फोडताना हा फटाका किती धूर आणि आवाज निर्माण करत आहे याचा विचार केला पाहिजे. मुंबईचे प्रदूषण एवढे कधीच नव्हते जेवढे आता वाढलेले आहे आणि अशा परिस्थितीत आपण ३ तास फटाके उडवून प्रदूषणात भर घालणार असू तर हे चुकीचे आहे. दिवाळी साजरा करण्याचे अनेक प्रकार आहेत. मोठ मोठे फटाके उडवून हवा प्रदूषित करू नका कारण, हायकोर्टाकडून आदेश दिलेले आहेत याचं नागरिकांनी गांभीर्य लक्षात घेऊन सण साजरा करायला हवा. असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकरांवर ठाकरेंनी विश्वास दाखवला अन्.. बांदेकरांच्या कामाची ठाकरे गटाकडून पोचपावती
दरम्यान, भाजप पक्ष कुठलीही शिस्त नसलेला पक्ष आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर होत नाहीत पण, तरीही आमचाच विजय झाला असे समजून जर फटाके फोडले असतील आणि मुंबईच्या व महाराष्ट्राच्या प्रदूषणात भर घातली असेल तर, महाराष्ट्राच्या भाजपाने विचार केला पाहिजे की, हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील आपण फटाके फोडतो किमान राजकीय पक्षांनी तरी याचं भान ठेवणे आवश्यक होते. लोकसभेचा आणि ५ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आता जवळच आहे त्यामुळे भाजपाचे पाय किती खोलात आहेत हे लवकरच भाजपला समजेल. असा इशाराही त्यांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती?, SIT चौकशी लावा,” पंकजा मुंडेंची मागणी
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?
हेही वाचा…हसन मुश्रीफ महादेव अॅपचे सदस्य..! राऊतांच्या आरोपांवर मुश्रीफांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..,