सोलापूर : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. तरी मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना विरोध करण्यात येत आहेत. यातच कार्तिकी एकादशीला विठ्ठण रखुमाईची शासकीय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार की उपमुख्यमंत्री अजित पवार करणार ? अशा चर्चा सुरू असतांना मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यात तीव्रपद्धतीने आंदोलने केली जात आहे. यातच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नसल्याचं मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून कार्तिकी एकदशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पुजेला बोलायवयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावर कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना न बोलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा
दरम्यान, मराठा आरक्षणावरून सकल मराठा समाजाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कडक इशारा दिला होता. मराठा आरक्षण द्या, नाहीतर कार्तिकी एकादशीला येऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मराठा समाजाच्या भावना पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकरांवर ठाकरेंनी विश्वास दाखवला अन्.. बांदेकरांच्या कामाची ठाकरे गटाकडून पोचपावती
हेही वाचा…पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“आम्हालाच ओबीसींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू”, छगन भुजबळांचा गंभीर आरोप
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल
हेही वाचा…“ना पार्थ पवार ना सुनेत्रा पवार..!” ‘पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदा’साठी अजित पवारांनी जाहीर केलं दुसरचं नाव