मुंबई : पहिलं आरक्षण रद्द झाल्यावर २ वर्षे कोणीच काही बोललं नाही. परंतु आरक्षणासाठी आज शासनाची दमछाक केली जात आहे. आरक्षण आताच द्या ही भूमिका घेतली जात आहे. पण ते कायद्याच्या चौकटीत बसलं पण पाहिजे ना. असं म्हणत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटलांकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
हेही वाचा…हसन मुश्रीफ महादेव अॅपचे सदस्य..! राऊतांच्या आरोपांवर मुश्रीफांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..,
श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका. आम्ही काय केलं हे विचारणारा हा कोण ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी तानाजी सावंतांना केला आहे. आरक्षण कशानं मिळेल हे वेळ आल्यावर सांगू. मराठ्यांच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. विरोधक मराठ्यांच्या जीवावर उठले आहेत तानाजी सावंत यांना काय वादळ दिसलं माहिती नाही. तुमची मस्ती आम्हाला दाखवू नका. असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा…“ना देवेंद्र फडणवीस ना अजित पवार,” कार्तिकी एकदशीला विठ्ठालाची शासकीय पुजा कोण करणार?
दरम्यान, राज्य सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटला आहे. आज हायकोर्टात ओबीसी आरक्षणाच्याबाबत सुनावणी देखील पार पडली. तर येत्या १७ तारखेला ओबीसी आरक्षण बचाव यासाठी ओबीसी नेत्यांचा महामोर्चा होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय आमचाच समजून भाजपने फटाके फोडले तर…” राष्ट्रवादीने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती?, SIT चौकशी लावा,” पंकजा मुंडेंची मागणी
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?