नाशिक : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा १५ ऑक्टोंबरच्या स्थितीत अनुसार ६५ टक्क्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडल्याचे नियोजन असल्याने आता नाशिक विरूद्ध मराठावाडा पाणी प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे.
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय
नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न पेटला असून नाशिकच्या शेतकऱ्यांकडून पाणी सोडवण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नाशिकहून मराठवाड्याला पाणी सोडल्यास स्थगिती देण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी करण्यात आली आहे. लहानु मेमाणे, नामदेव डांगले आणि शरद शिंदे यांनी याचिका दाखल केली होती.
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
भाजप नेत्या अमृता पवार यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मेंढिगिरी अहवालाची पुनर्रचना करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या आदेशाला देखील न्यायालयात आवाहन देण्यात आलं आहे. मराठवाड्यापेक्षा नाशिकमध्ये जास्त दुष्काळ असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. प्रसिद्ध वकिल कपिल सिब्बल न्यायालयात नाशिकची बाजू लढण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नांदेडचे ‘हे’ पिता-पुत्र शिंदे गटात दाखल, शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश प्रवेश
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका”, तानाजी सावंतांना मनोज जरांगे पाटलांनी खडसावलं
हेही वाचा…“ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय आमचाच समजून भाजपने फटाके फोडले तर…” राष्ट्रवादीने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती?, SIT चौकशी लावा,” पंकजा मुंडेंची मागणी