नाशिक : राज ठाकरे यांनी जो काही मशिदीवरी भोंग्यासंदर्भात कठोर भूमिका घेतली होती. त्याबाबत अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अनेकांना अटक केली. परंतु त्यानंतर विविध शहारात पहाटेचा अजाण 90 ते 95 टक्के बंद झाला. तसेच काही मशिदीवरील अजाणचा आवाज कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून पुन्हा आवाज वाढल्याच्या तक्रारी आमच्याकडे यायला लागल्या. त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांना आम्ही अर्ज दिला असून 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. असं मनसे नाशिक शहाराध्यक्ष दिलीप दातीर यांनी म्हटलं आहे.
“त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
सर्वोच्च न्यायालयातील आदेशानुसार मशिदीवरील भोंगे हटवावीत. याअगोदर आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन केलं होतं. आताची आंदोलनाची सुरूवात ही उघड असणार अन् त्याची सुरूवात नाशिकमधून होईल, असा इशारा देखील दिलीप दातीर यांनी दिला आहे. मागचं सरकार हनुमान चालिसाचा कोप झाल्याने कोसळलं आणि आता तर हिंदुत्वाच्या नावावर सरकार आलं आहे. त्यामुळे आता तर सरकारला देखील आम्ही विनंती करणार आहोत. असंही ते म्हणाले.
“तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
गेल्या काही महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी ठाणे, आणि त्यानंतर औरंगाबादच्या सभेत भोंग्यासंदर्भात आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर मनसेने राज्यभर आंदोलन केले होते व त्याचा परिणाम म्हणून राज्यातील 90 टक्के मशिदीवरील भोंगे बंद झाले होते.
Read also
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
- “केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
- दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान