मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी अद्याप वर्ष असले तरी राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप, सेनेसह मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्ष तयारी करत आहे. आता यात मनसे देखील या राजकीय आखाड्यात जोमाने उतरताना दिसत आहे.
मनसेने आता मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची थेट विरप्पन गँगशी तुलना केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरप्पनचा एन्काऊंटर करावाच लागेल, असा शाब्दिक हल्ला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर चढवला आहे.
विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 29, 2021
विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘असा’ मिटणार धनंजय मुंडे आणि करूणा यांच्यातील वाद!
- ‘आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही’, फडणवीसांचे सूचक वक्तव्य
- भाजपच्या मनधरणीला अपयश, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण
- ‘आता एक बाजू निवडण्याची वेळ आलीये’, शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका
- ‘मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला