नागपूर : मागील काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडणार अशा चर्चा सुरू आहेत. सध्या मंत्रीमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांची नावे देखील प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. एच. के. पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रभारी पदी आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद देखील बदलणार का ? अशी चर्चा आहे.
यातच आता विदर्भातील मंत्र्याला प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. याबाबत टिव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भातील मंत्री प्रदेशाध्यक्ष व्हावा, अशी मागणी धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत केली आहे.
काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष हवा. विदर्भात पक्षाला मोठा स्कोप आहे. त्यामुळे काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा, असे धानोरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
Read Also :
- ‘भाजपने आता उधारीचा गुलाल उधळून घेऊन मन शांत करावं’, यशोमती ठाकूर यांचा टोला
- पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं! ‘त्या’ बंडखोराविरोधात स्वतः ममता बॅनर्जी मैदानात
- धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता – चित्रा वाघ
- दोन दिवसात मोठे हादरे देणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी कधीच बाहुबलीचे राजकारण केले नाही’