मुंबई : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपाठोपाठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्या दावा प्रत्येक पक्षाकडून केला जात आहे. भाजपकडून देखील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर, नंदुरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशी, बुलढाणा या 13 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेल्याचा दावा केला आहे. तसेच, विदर्भात 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळाल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.
ही ‘भाजपमुक्त गाव’ च्या दिशेने वाटचाल आहे. भाजपने आता उधारीचा गुलाल उधळून घेऊन मन शांत करावं. जिंकून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मनापासून अभिनंदन. pic.twitter.com/qAWGBgXHNT
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 19, 2021
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर भाजपवर निशाणा साधला असून, ही ‘भाजपमुक्त’ गावाची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ही ‘भाजपमुक्त गाव’ च्या दिशेने वाटचाल आहे. भाजपने आता उधारीचा गुलाल उधळून घेऊन मन शांत करावं, असा टोला यशोमती
ठाकूर यांनी लगावला आहे. सोबतच त्यांनी जिंकून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे देखील अभिनंदन केले.
Read Also :
- पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं! ‘त्या’ बंडखोराविरोधात स्वतः ममता बॅनर्जी मैदानात
- धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता – चित्रा वाघ
- दोन दिवसात मोठे हादरे देणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी कधीच बाहुबलीचे राजकारण केले नाही’
- ‘असं सरकार चालवता येत नाही’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना प्रत्युत्तर