मुंबई : फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राजकारण चांगलच तापलं आहे. यावरून महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे वेळ पडल्यास दोन मुख्यमंत्री नेमा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. सोबतच त्यांनी अजित पवार यांनी वेदांता ग्रुपच्या प्रकल्पाबाबत लिहिलेले पत्राचा विचार करावा, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचे कळते. वेदांता व तेवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली.
“राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
जागा निवडीसाठी एकुण १०० मुद्दांचा विचार करुन त्यांनी तळेगांव टप्पा ४ ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, अॅटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, JNPT शी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगांव येथील १००० एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरीष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगांव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र वरीष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगांवच्या तुलनेत काहीच नाही.
संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार ( MOU ) करणार आहेत, असे कळते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे पंरतू ही गुंतवणूक जाऊ देऊ नये . यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. कारण यामधून मोठया प्रमाणावर GST मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे शिंदे-फडणवीस सरकारला केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपणांस नम्र विनंती आहे, की आपण अजितदादा पवार यांनी वेदांता ग्रुपच्या प्रकल्पाबाबत लिहिलेले पत्र विचारात घेऊन, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/5jLSpr0VFl
— Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2022
Read also
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
- “काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली, मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे”; प्रमोद सावंत
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस