मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना फुटीरतानंतर जोरदार बैठका सुरू आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मोठी रणनिती आखत आहेत. त्यातच आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्या काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी नेतेपदी शिवसेनेचे पाच तर 26 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
यामध्ये रामदास कदम, आनंदराव अडसुळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मात्र संजय शिरसाठ आणि प्रताप सरदेसाई यांना पुन्हा एकदा डावल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाच्या आशेवर असलेले संजय शिरसाठ पुन्हा एकदा शिंदे गटाच्या बाहेर फेकल्याने एकच चर्चा रंगू लागली आहे.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केले. मी काम करताना अतुल सावे राजकारणात कधी येतील हे मला वाटलं नव्हेत. परंतु ते मागून आले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्रीही झाले, सगळचं झालं. अरे आमच्याकडेही बघना जरा, आज काल सिनीयरीटी काही उरली आहे की नाही, ? असा सवाल याअगोदर संजय शिरसाठांनी उपस्थितीत केला होता.
“जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
दरम्यान, शिवसेनेच्या उपनेते पदी अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशंवत जाधव, अर्जून खोतकर, दिपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षें, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read also
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर