मुंबई : पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या बदलण्याचा ब्रिमस्टोवॅड प्रकल्प सुरू करून तब्बल तेरा वर्षे झाली. मात्र या प्रकल्पातील ५८ पैकी फक्त २५ ते २६ कामेच पूर्ण झाली आहेत. मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याचे हे ही एक कारण आहे. तुंबलेल्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा प्रभावी नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून नालेसफाईचे दावे पोकळ ठरल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. यावरून आता काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.
रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
भाई जगताप यांनी सोशल मिडियावर मुंबईच्या पावासाचे काही छायाचित्र पोस्ट करून महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. भाई जगताप म्हणतात.. अभिनंदन, मुंबई २४/७ वॉटर पार्क मध्ये बदलली गेली. मुंबईकरांनो जागे व्हा, तुम्ही असेच जगणे स्वीकारले आहे का? किती वर्षे हे सहन कराल?, असा प्रश्न उपस्थित करत जगतापांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार?, मुंबईकर सुडकेचा मोकळा श्वास कधी घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सोशल मिडियावरही नेटकऱ्यांनी या परिस्थितीची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, लसीकरण करणार जलद गतीने
मुंबईत ५० मिमी पाऊस झाल्यास हे पाणी वाहून नेण्याची क्षमता यंत्रणेमध्ये आहे. मात्र मुंबईत गेल्या तीन दिवसांत तब्बल पूर्ण जून महिन्यात होणारा पाऊस पडला आहे. कुलाबा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दिवसांत ५१७ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेच्या आकडेवारीनुसार ९८२.२ मिमी पाऊस पडला. ही सरासरी ५५० मिमी इतकी आहे. यामध्ये अनेक वेळा समुद्रात भरती असल्याने मुंबईत ५३ ठिकाणी पाणी तुंबल्याचे पालिकेने स्पष्ट केले. मुंबईत साचलेले पाणी उपसण्यासाठी १४०० पंप कार्यान्वित होते अशी माहिती पालिकेने दिली. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मध्यरात्री १ वाजता सर्व वॉर्डातील सहायक आयुक्त आपापल्या विभागात हजर राहिले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Read Also :
- जयंत पाटलांचं सांगलीकरांना कळकळीचं आवाहन! मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन तातडीने स्थलांतरीत व्हा!
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश
- रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
- महाड येथील बचावकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरु आहे अडकलेल्यांची सुटका
- राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे