कोल्हापुर : चारच दिवसापुर्वी भाजपचे एक नेते यांनी दिल्लीत अनेकवेळा चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न सुरू ठेवले होते. माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं की, मुश्रीफांवर इडीची कारवाई होणार आहे. अशा पद्धतीने नाउमेद करण्याच काम सुरू आहे. हे गलिच्छ राजकारण सुरू आहे. पहिल्यांदा नवाब मलिकांवर कारवाई झाली. आता किरीट सोमय्या म्हणाताहेत की असमल शेख यांच्यावर कारवाई होईल. विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गट केलं जात आहे की काय? अशी शंका मला यानिमित्ताने होत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यांच्या घरावर आज इडी आणि आयकर विभागने धाड टाकली आहे. त्यावर ते बोलत होते.
शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या नातेवाईकांच्या घरावर, मुलींच्या घरावर इडीने छापे घातले आहेत. कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सकाळपासून सुरू आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवावी. यातच कागल बंद ठेवण्याची घोषणा केली होती. ती कृपया मागे घेण्यात यावी. त्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण संपुर्ण सहकार्य करावं. तसेच कायदा व सुव्यवस्थेला हाणी पोहचेल अशी कोणतीही कृती करू नये. इतकी विनंती करतो.
“मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस
या पुर्वी देखील अशा प्रकारचे छापे माझ्यावर पडले होते. त्यातून आवश्यक माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी माझ्याकडून घेतली होती. पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आला आहे. याची मला काही माहिती नाही. माझं सार्वजनिक जीवन लोकांना माहिती असून दीड दोन वर्षापासून जी कारवाई झाली होती. त्यातून काहीही निष्पण्न झालेलं नव्हतं. पुन्हा कुठल्या हेतूने माझ्यावर हा छापा घालण्यात आला. हेही समजत नाही. याचा पुर्ण खुलासा घेऊन प्रसार माध्यामांना प्रतिक्रिया देणार आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?
- अतिथी देवो भवं..! आमच्याकडे पाव्हाणे आले, त्यांचे स्वागत करू..! मुश्रीफांच्या कारवाईवर सुळेंची प्रतिक्रिया
- मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या घरी इडी अन् आयकर विभागाची धाड, राष्ट्रवादीचा तिसरा नेता रडारवर
- “डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”
- “स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”