मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांच्यात चालू झालेला संघर्ष कदाचित आज थांबण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णयाप्रत येण्यासाठी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मविआच्या नेत्यांना भेटीची वेळ दिली आहे. दरम्यन
मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, मागील आठवड्यात राज्यपालांच्या भेटीवरुन हाय व्होल्टेज नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते २६ ऑगस्टला राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, ही भेट अचानक रद्द झाली. कारण या भेटीबाबत दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना माहितीच नसल्याने भेटीबाबत सरकारमधेच समन्वयाचा अभाव दिसून आला.
अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
तसेच, नंतर नाना पटोलेंनी यावरून राज्यपालांवर टीका करताना, राजभवनाकडे वेळ मागितली होती, पण वेळ दिली गेली नाही. १२ आमदारांची नियुक्ती झाल्यास भाजपत फूट पडेल अशी भीती भाजपला वाटत आहे. कारण राज्यपालांनी अनेकांना आश्वासनं दिली होती. राज्यपालांवर दबाव आहे, त्यामुळेच त्यांनी आमदारांची नियुक्ती रखडून ठेवली आहे,” असा आरोप केला होता तर, “दु. ४ पर्यंत राज्य सरकारकडून राजभनवाकडे कोणतीही वेळ मागण्यात आली नव्हती,” असं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं.
यात्रा आणि आंदोलन करणाऱ्या भाजप-मनसेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले, म्हणाले…
दुसरीकडे, या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वादात मुंबई हायकोर्टाने, “या जागा जास्त काळ रिक्त ठेवू शकत नाही. राज्यपालांच्या अधिकारांबाबत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या. काही विशिष्ट कारणांसाठी असे होत असेल तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं नमूद केलं होतं. त्यानंतर या मुद्द्यावरून राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार एकमेकांशी संवाद साधण्याचा सकारत्मक प्रयत्न करताना दिसून आले.
Read Also :
- व्यस्त होते तरी परबांनी चौकशीला जायला हवे होते, चंद्रकांत पाटलांचे सूचक भाष्य
- बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात – उद्धव ठाकरे
- इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान
- प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रंगली जुगलबंदी; परळीतील कार्यक्रमात एकमेकांना काढले चिमटे
- हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन