अमरावती : आमच्या पीढ्यानं पीढ्या भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आलो आहे. याठिकाणी आणण्यासाठी आपल्या देशाच्या सैनिकांचं योगदान खुप मोठं आहे. जगात आपला भारत देशात जाती पातीला मानत नाही. याठिकाणी सगळ्यांना एकसमान वागणूक दिली जात आहे. देशाने आपल्यासाठी खुप काही दिलं आहे. त्यामुळे आपलं पण देशाला काही तरी देणं हे कर्तव्य आहे. असं मत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसला?
अमरावतीच्या जिल्हा कार्यालयात नवनीत राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. देशाचा स्वाभिमान खुप मोठा आहे. तो स्वाभिमानासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला हवं. अशी आपली मानसिकता तयार झाली पाहिजे. असंही त्या म्हणाल्या.
शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा
तसेच देशाच्यासाठी आपल्याकडून जे काही लागेल. ते देण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण काम केलं पाहिजे. आजचा तरूण सोशल मीडियाचा वापर जास्त करत आहेत. परंतु आजच्या दिवशी 99.90 टक्के भारताच्या स्वातंत्र्याची गाणे आणि तिरंगा सोशल मिडीयावर टाकत आहे. तसेच जीवन जगेन तर या मातीसाठी मरेन तरी या मातीसाठी, कारण ह्या देशाने मला खुप काही दिलं आहे. असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
Read also
- प्रकाश आंबेडकरांनी शुद्धवर येऊन बोललं तर बरं होईल…! विद्या चव्हाणांचा आंबेडकरांना सुचक इशारा
- “शरद पवार आजही भाजपसोबत, पहाटेचा शपथविधीही नंतर..;”प्रकाश आबंडेकरांचं मोठं वक्तव्य
- “खून देने की जरूरत नहीं, तुम्ही हमें सिर्फ वोट दे दो..!” उद्धव ठाकरेंचं शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून आवाहन
- “माझ्या बाजूला जलील बसले मग आम्ही एमआयएमचे झालो का?” संजय शिरसाठ
- “उद्धव ठाकरेंना विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल