मुंबई : महाराष्ट्रात सध्या राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्यात अधिकच रस घेत असल्याचं काहीसं चित्र समोर दिसतंय. मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अधिवेशनात देखील जनतेच्या कामांवर बोलण्यापेक्षा एकमेकांवर वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक करणे यात नेत्यांनी धन्यता मानलीय. आता पुन्हा एकदा राज्यातील प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. त्यावरुन राज्यातील राजकारण चांगलाचं तापलं आहे.
फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
२ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याआधी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत उद्घाटन केल्याचा दावा केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पडळकरांवर जोरदार टीका करण्यात आली. यावर उत्तर देताना खोतांनी म्हटलं की पवार साहेब खूप मोठे आहेत. महाराष्ट्रात त्यांनी काड्या लावण्याव्यतिरित कोणतेही काम केलं नाही. त्यांचे नाव बदलून आगलावे ठेवावे. राज्य होरपळत असताना आता त्यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला हाणलाय.
एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते आता काहीही बरळू लागले आहेत. सदाभाऊ खोतांचे नाव बदलून ‘उपाशी खोत’ ठेवण्यात यावे असा टोलाही त्यांनी सदाभाऊ खोत यांना मारला. भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेत मंत्रीपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यानंतर काहीच सुचेनासे झाले आहे. महाविकास आघाडीचे संस्थापक आणि जनक शरद पवार असल्यामुळे खोत त्यांच्यावर बरळू लागले आहेत. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असा मिश्किल टिप्पणी देखील मिटकरींनी केली आहे. त्याचबरोबर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. एका जेष्ठ नेत्याबद्दल असे बोलणं अशोभनीय आहे. आपली पात्रता नसताना एखाद्या जेष्ठ नेत्यांबद्दल असं बोलणं हे अत्यंत चुकीचे आहे. आदरणीय पवार साहेब हे आमचेच नाही तर सर्वांचेच आदरणीय नेते आहेत. त्यामुळे मी सदाभाऊंनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो असं देखील आमदार लंकेनी म्हटलंय.
कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष अधिकच चिघळू लागला आहे. राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चांगल्याचं फैरी झाडल्या जात आहेत. त्याचबरोबर राज्यात आगामी काही काळात महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- ” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
- तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं
- आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
- काँग्रेस बाप आहे हे फार उशिरा कळले ? महापौर संदीप जोशींचे नानांना शाब्दिक टोले
- अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात