मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पती आहे तर शिवसेना न बोलणारी पत्नी आहे. काँग्रेस हे या दोंघांच्या लग्नातील वऱ्हाडी मंडळी आहे. वधू-वराने कितीही हटकलं तरी काँग्रेस बिनलाज्यासारखं ताट घेऊन बसत आहे. त्याला कितीही हटकलं, त्यांना हाणलं, जेवायला बोलवलं नाही तरी देखील लाचारसारखं काँग्रेस ताट सोडायला तयार नाही असं म्हणत सुजय विखेंनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर आता भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांनी टिप्पणी केलीय.
आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार सुजय विखेंबद्दल बोलणे टाळले होते. खासदार सुजय हे वयाने अद्यापही लहान आहेत आणि त्यांना अजून बरंच राजकारण पाहायचं असल्याने मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही. काँग्रेस पक्षाने देश स्वतंत्र केला आहे हे सर्वांना माहित आहे. त्यापासून तर सध्या जे काही प्रस्थपित नेते भाजपमध्ये आहेत त्यांना काँग्रेसनेच मोठे केले आहे. त्यामुळे जे लोक कॉंग्रेसच्या विरोधात बोलतात, ते नादान आहेत.
उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
कॉंग्रेसच्या भरवशावर मोठे झालेले नेते आता तिकडे जाऊन विरोधात बोलू लागले आहेत, याची मला निश्चितपणे खंत वाटते. महाराष्ट्रात काँग्रेस हा काही लाचार नाही तर बाप आहे हे त्यांनी नीट लक्षात ठेवावं आणि यापुढेही काँग्रेस बापचं राहणार असा स्पष्ट इशाराही पटोलेंनी विखेंना दिला. यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांनी नाना पटोलेंना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘काँग्रेस हा राज्यात बाप आहे हे नानांच्या आता लक्षात आले का ? ज्यावेळी नाना पटोले काँग्रेसमधून भाजपात आले आणि भाजपचे खासदार झाले तेव्हा ते झोपले होते का ? आणि आता काँग्रेसमध्ये गेले तर लगेचच काँग्रेस बाप झाला हे त्यांना कसं कळलं असा टोलाही त्यांनी नाना पटोलेंना हाणला आहे.
Read also:
- अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात
- फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे
- कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
- कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड