मुंबई : आगामी काही दिवसात गुडी पाडवा आणि राम नवमी सण येत आहेत. राज्यात अजूनही काही प्रमाणावर कोरोनाचे नियम लागू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सतंप्त सवाल करत टीका केली आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कांयदे यांनी आशिष शेलार यांना जोरदार टोला हाणला.
पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
मनिषा कांयदे म्हणाल्या की, आशिष शेलार हे आता पातळीसोडून बोलायला लागले आहेत. ते असं म्हणतात की हाताला लकवा लाकलाय का?आशिष शेलार याद राखा, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक तुम्हाला पळता भूई करून सोडणार नाहीत. आम्ही तर असे म्हणतो की तुमच्या मेंदूला लकवा मारलाय. ही कुठली पातळी आहे, की सत्ता गेलीय म्हणून तुम्ही इतके वैफल्यग्रस्त व्हावे, असा प्रश्न उपस्थित होतोय, असं त्या म्हणाल्या.
खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
महाविकास आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जेव्हा जेव्हा राज्यात हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केला आहे. हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुका यांना परवानगी द्या, अशी देखील मागणी त्यांनी केलीय.
आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
दरम्यान, आशिष शेलार यांनी नाना पटोले यांनी खोटं बोलणारी गुडीया म्हटलं आहे. खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले. ती गुडिया चावी दिली की बोलते. त्याला समर्थन आणि जनभावना कधी नसते असं म्हणत आशिष शेलार यांनी नाना पटोले यांच्यावर टिका केलीय. तर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणजे मुंबई नव्हे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. भ्रष्टाचार मुक्तीला राज्यातील जनतेचं समर्थन आहे. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घड्याळ प्रकणावरीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कडवड हिंदूने ते करू नये. आईच्या नावाने खोटं बोलणारी जमात वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Read also:
- उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
- आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
- मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
- आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल