सोलापूर : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता शिवसेेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची जाहीर कार्यक्रमातून कानउघडणी करत जोरदार निशाणा साधला. सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई उपस्थित होते. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करावा असं केलं होतं. त्यावर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय भाजपासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा? जर भाजप पक्ष प्रमुख्याच्या घरापर्यंत जाणार असेल, तर पक्षप्रमुखांनाही माहिती आहे की, महाराष्ट्र शाबुत ठेवायचा असेल. टिकवून ठेवायचा असेल तर भाजपपासून महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंत यांना समज देतील.
आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
विरोधी पक्षांनी जे बोंबालयचं ते बोंबलु द्या. तथ्य काय आहे. ते समजा. 57 ते 60 टक्के निधी राष्ट्रवादीला, 35 टक्के काॅंग्रेसला आणि शिवसेना 16 टक्के निधी दिलं जातं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमचं असल्यानं पगारांवर त्याठिकाणी 6 टक्के जातंय. विकासाचं काय? त्यासाठी फक्त 10 टक्के आहे. विविध शहरांतील जिल्हा प्रमुखांचे मला फोन येतात. त्याठिकाणाचा ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे जाऊन 1 ते 2 कोटींची कामे मंजूर करून येतो आणि ते आपल्या छातावर बसतात. ते आमदार आणि खासदरांना मिळत नाही. आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय, असा इशारा देखील तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसला दिला आहे.
ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही
दरम्यान, ते म्हणाले की, 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलंलं दाखवावं, मी आता आमदारकीचा राजीनामा देतो. विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो. की तुम्ही आमचं का वाकून बघताहेत. तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे.
Read also:
- आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
- मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
- आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
- पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल