कोल्हापूर : जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे. कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे.
आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तरेत थेट कोथरूड भाजपची कार्यकर्त्यांची फौज उतरवली आहे. सत्यजित कदम यांच्या प्रचारात जास्तीत जास्त कार्यकर्ते असावेत म्हणून थेट कोथरूड भाजपला पाचारण करण्यात आले आहे. कोथरूड भाजपच्या कार्यकर्त्यांवरून आता भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये चांगलाच संघर्ष झालेला पाहायला मिळत आहे.
हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
कोल्हापूर उत्तरेत तीन लाख कार्यकर्ते उतरवणार असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याला उत्तर म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीन लाख तर मतदार असताना आणखी तीन लाख लोकांचं काय करणार ? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. त्यापेक्षा त्यांना युक्रेनला पाठवा,निदाण त्या बिचाऱ्यांना मदत तरी होईल असा टोमणाही मुश्रीफ यांनी लगावला आहे.
पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
भाजपने बाहेरचे लोक प्रचारासाठी आणले आणि त्यामुळे कोल्हापूरचा स्वाभिमान दुखावला आहे असा शिमगा करणाऱ्या हसन मुश्रीफांनि नवाब मलिक यांच्यासाठी कागलमध्ये मोर्चा काढताना कोल्हापूरचा अभिमान दुखावला नव्हता का ? असा संतप्त सवाल केला आहे. कोल्हापूर उत्तरेत कोथरुडमधून आलेले भाजप कार्यकर्ते थेट घरोघरी जात प्रचार करत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना भाजपला मतदान करा, असे आवाहन करत आहेत. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला ट्रेनींग म्हणून इतरही भागात पाठवले जाते असं भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
- आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
- उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
- आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
- मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा