मुंबई : पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काॅंग्रेस पक्षाची चांगलीच गंच्छती झालेली बघायला मिळाली. पंजाबमध्ये असलेली सत्ता देखील काॅंग्रेसने गमावली. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून काॅंग्रेसच्या नेतृत्वाबाबत शंका निर्माण केली जात आहे. अशातच आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सुशिल कुमार शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
तरुणांच्या नेतृत्वाबाबत बोलताना ते म्हणाले की, तरूणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली. असं मला वाटत. मात्र अशी मी पक्षावर थेट टीका करू शकत नाही. आम्ही 10 वर्षाची सत्ता भोगल्याने आम्ही सक्रिय नव्हतो. त्यामुळे संघटना बांधनी झाली नाही. एकट्या राहुला गांधीना दोष देणे शक्य नाही. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता. असंही त्यांनी म्हटलं.
आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पंजाबमधील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही. खेळात जसे प्रयत्न केले तसे प्रयत्न केले. त्यांना मुख्यमंत्री सोबत जमवून घेतले नाही. त्याचबरोबर सध्या जात, धर्मावर सर्व राजकारण सुरू आहे. हे जास्त काळ चालणार नाही. सगळं बदलेल. लोक भाजपचा तिरस्कार करतील. देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत. केवळ आकडे फुगवून चालणार नाही. काॅंग्रेसकडे हे भाजप पेक्षा वेगळं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला हवे. समान कार्यक्रम त्यांनी अवलंबला. तीन पक्ष सोबत घेऊन चालणे कठिण आहे. तिन्ही पक्ष सध्या चांगलं काम आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवर पोट ठेवत त्यांनी सीबीआय, इडी यांचा वापर कधी असा झाला होता का ? याबद्दल जास्त न बोललंल बरं होईल. असं ही ते म्हणालेत.
हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
दरम्यान सुशिल कुमार शिंदे यांनी अलिकडेच दिव्य मराठी पेपरमध्ये काॅंग्रेसच्या सध्यस्थितीबाबत चुकांमुळे काॅंग्रेस पक्ष कमकुवत झाला पण.., हा लेख लिहिला होता. त्याबाबत एबीपीबी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी सुशिल कुमार शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, देशात काॅंग्रेस अजूनही मजबुत स्थितीमध्ये आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाशैलीमुळे तसेच प्रचार मोठ्या प्रमाणात केल्याने भाजपने देशात सत्ता स्थापन केली. त्यांच्यापुढे देशातील अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामाना करावा लागला. मोदींनी सोलापुरात सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होतं. मात्र एक ही रूपयाचा कप़डा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले,
Read also:
- कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
- कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
- आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
- उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
- आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय