सोलापूर : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता शिवसेेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची जाहीर कार्यक्रमातून कानउघडणी करत जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलंलं दाखवावं, मी आता आमदारकीचा राजीनामा देतो. विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो. की तुम्ही आमचं का वाकून बघताहेत. तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे. आता यावर शिवसेनेचेच नेते भाऊसाहेब अंधळकर यांनी तानाजी सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
सोलापुरात युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई उपस्थित असताना तानाजी सावंत यांनी जी खदखद व्यक्त केली. त्याला आम्ही शिवसैनिक सहमत नाही. कारण त्यांची ही खदखद त्यांची वैयक्तिक आम्हाला वाटली. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. त्यावर आम्हाला काही त्रास होत नाही. आम्हाला यामध्ये काही त्रास झाला त्याबद्दल तुम्ही चिंता कधी केली नाही. तुम्ही शिवसेना नाही आहे. तर सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या तीस वर्षाच्या कालावधीत भाजपने काय केलं. आणि या कालावधीत राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात होती. आता आपण एकत्र आहोत. असं वरूण देसाई म्हणून तुम्हांला एका वाक्यात उत्तर दिलं होतं. असंही ते म्हणाले.
कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
तानाजी सावंत यांनी भाजपच्या प्रवक्ते असल्यासारखं भाषण केलं आहे. धाराशीव, उस्मानाबाद मध्ये तुमचा पुतण्या धनंजय सांवतसाठी भाजप सोबत युती केली. शिवसंपर्क अभियानात शिवसेनेचे खासदार आले तेव्हा देखील तुम्ही सहकार्य केलं नाही. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. २०१९ च्या मंत्रिमंडळातून तुमचा पत्ता कट झाल्याने तुमची ही खद खद आहे.
आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर असल्यानं आम्हाला आनंद आहे. साखर काऱखाने, शिक्षण संस्था चालवण्यासाठी तुम्हांला पैसा लागतो. आम्हां शिवसैनिकांना त्यासाठी आम्हाला पैसा लागत नाही. शिवसेना नाराज नाही. तुमची स्वत:ची ती खदखद आहे. हे सरकार येत्या पाच वर्षपर्यंत चालणार आहे. येत्या पंचवीस वर्षात उद्धव ठाकरे यांना देशाच्या महत्वाच्या पदावर बघण्याचं स्वप्न शिवसैनिकांनी पाहिलं आहे. सोलापुरात काय चाललंय हे पक्षप्रमुखांना माहिती आहे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी रिपोर्ट देत असतो. तुमच्या मागे इडीपीढी लागली आहे का ? त्यामुळे तुमच्या भाषेत बदल झाला आहे का ? मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवा. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. असंही त्यांनी म्हटंल आहे.
Read also:
- आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
- काँग्रेस बाप आहे हे फार उशिरा कळले ? महापौर संदीप जोशींचे नानांना शाब्दिक टोले
- अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात
- फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे