नवी दिल्ली : राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल चित्र बघायला मिळत आहे. निधी वाटपावरून शिवसेनेतील काही आमदारांनी जाहीरपणे नाराजी दाखवत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर हल्लाबोल केला. अशातच आता काॅंग्रेसचेही 25 आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी यासंदर्भात काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी भेट देखील घेतली आहे.
कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
आपल्याच पक्षाचे मंत्री आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी निधी देत नाहीत. तर पक्ष निवडणुकीत चांगली कामगिरी कशी करणार ? असा प्रश्न एका आमदाराने केला आहे. याबाबत द इकॉनॉमिक्स टाईम्सने बातमी दिली आहे. त्यानुसार काॅंग्रसचे 25 आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
काॅंग्रेसच्या आमदारांच्या समस्या सो़डवण्यासाठी नुकतीच आघाडी सरकारमधील प्रत्येक मंत्र्याला तीन आमदार नेमुन दिले होते. महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी यांसदर्भात बैठक घेतली होती. तेव्हा आम्हाला माहिती मिळाली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आम्हाला अडिच वर्ष याची माहिती दिली नाही. कोणत्या मंत्र्यांकडे आमची जबाबदारी सोपविली आहे. याबाबत आम्हाला अद्यापही माहिती नाही, असं त्या आमदारांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
दरम्यान, निधी वाटपावरून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी सोलापुरात राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या बरचं काही चालल्याचं सध्याच्या राजकीय परिस्थीतीवरून दिसून येत आहे.
Read also:
- काँग्रेस बाप आहे हे फार उशिरा कळले ? महापौर संदीप जोशींचे नानांना शाब्दिक टोले
- अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात
- फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे
- कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली