मुंबई : राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या अशा विविध मुद्यांवरून राजकारणा चांगलाचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 3 तारखेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यात आहे. तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवरील हनुमान चालिसा पठणाची घोषणा काहीशी राज्याच्या परिस्थितीबाबत चिंताजनक होती. या सर्व परिस्थितीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे.
आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
मुंबई येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराव करण्याचा प्रयत्न होत आहे. असंही ते म्हणालेत .
महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला
दिल्लीतील काही घटनांचा संदर्भ देत शरद पवार यांनी राज्यातील परिस्थिबाबत विरोधकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रामध्येही जर कोणी सामाजिक वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वांनी एकत्र येऊ हे प्रयत्न अयशस्वी होतील हे पाहिलं पाहिजे असं भाषणांमध्ये ते बोलले.
मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?
दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. अशातच येत्या 3 मे पर्यंत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचे सांगितले आहे. जर मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाही तर त्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यातील परिस्थिती कशी असणार त्याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- “मोदींनी मुळ विषय सोडून इतर विषयांवरच तारा छेडल्या”; राऊतांनी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून छेडले
- “आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला
- अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”
- ..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
- नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ