कोल्हापुर : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी हिंदूत्वाबाबत जोरदार भाषण केलं. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात. हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात जे आज ठरवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“निवडणुका जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, पण..:” गुलाबराव पाटलांचं सुचक वक्तव्य
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरूप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा, एक कडवड हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत. त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका, फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे. असंही नितेश राणे म्हणाले.
“मग हे संघ भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील”; राष्ट्रवादीने डिवचलं
राज्यातील मागील काही घटनांवरून नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अहमदनगर येथे घडलेल्या घटनांनंतर देखील त्यांनी त्याठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढला होता. यातच आज कोल्हापुरमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला होता. तसेच मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तीकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जिवंत ठेवत नाही. अशी असंख्य उदाहरण मी तुम्हाला देतो असंही ते म्हणाले.
Read also
- अमृता फडणवीसांच्या सुरक्षा वाढविली..! फडणवीस म्हणाले, “धोक्याची भीती..;”
- संजय राऊतांच्या भोवती पोलिसांचा गराडा..! दिलासा नाहीच, पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला
- राहुल गांधीच्या पदयात्रेत धक्काबुक्की..! महाराष्ट्रातील बडा नेता गंभीर जखमी
- भाजप-शिंदेंना पाणी पाजण्यासाठी ठाकरेंची मोठी रणनीती.! तयारी आतापासून सुरू
- “उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात”; ठाकरेंच्या पक्षाला गळती सुरूच