मुंबई : गेल्या चार पाच दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. पण आजही आम्ही शिवसैनिक आहोत, उद्याही शिवसैनिक असू, किंबहुना आम्ही शिवसैनिक म्हणूनच हे जग सोडू. असं वक्तव्य बंडखोर आमदार यामिनी जाधव यांनी केलं आहे. याचसोबत त्यांनी शिवसेनेवर धक्कादायक आरोप देखील लावले आहेत.
बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
यशवंत जाधव साहेब, 47 वर्षापासून शिवसेनेत आहेत. 17 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. अनेक अडचणी आल्या. आर्थिक अडचण, अनेकदा निवडणुक हरलो, पण कधीही त्यांनी वेगळा विचार केला नाही. गेले काही महिने, ऑक्टोबरपासून माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. कॅन्सर नावाचं. माझ्या कुटुंबाला समजलं, पुर्ण कुटुंब तुटलं. कॅन्सर या आजाराची माहीती पक्षाला द्यावी लागते. ती माहिती यशवंत जाधव साहेबांनी पक्षातील प्रमुखांना दिली. असंही त्या म्हणाल्या.
“नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
एक महिला आमदार म्हणून मला अपेक्षा होती की माझे काही नेते घरी येतील. महिला आमदार कॅन्सरने ग्रस्त आहे, ही गोष्टच मोठी हादरवणारी होती. कॅन्सर या शब्दाने मी कोलमडून गेले होते. माझ्या कुटुंबाने माझ्या मतदारसंघातील सहकाऱ्यांनी मला खुप साथ दिली मी त्यांचे आजही आभार मानू इच्छिते. अपेक्षा होतीकी माझी विचारपुस केली जाईल, एक आधाराची थाप जाधव कुटुंबांना मिळेल. पण तसंच झालं नाही. किशोरीताई माझ्या घरी आल्या त्यांनी मला अनेक सुचना दिल्या हे कर म्हणजे तुला बंर वाटेल. पण मला अपेक्षा होती की नेते विचारतील. पण कोणत्याही नेत्याने माझी विचारपुस केली नाही.
“राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
मी स्वत: 2012 पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नीला कॅन्सर झालेला मी पाहिला त्यांना भेटायला मी गेले होते. त्यांच्यासारखी माझी मरणासन्न होणं गरजेचं होतं. असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेसोबत बेईमानी कधीही कऱणार नाहीत. काहीतरी कारण त्यामागे असेल. शिवसैनिक ते समजूल घेतील. अशी अपेक्षा आहे. अशी भावनिक साद देखील त्यांनी घातली आहे.
Read also:
- भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;
- “अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील
- निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
- “बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
- ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन