मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 47 आमदार आणि 4 मंत्री यांना घेऊन बंड केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीतुन बाहेर पडण्यासाठी सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार पडणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना 24 तासांची वेळ दिली आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! असे ट्विट केले होते. यावर भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांना धीर धरायला सांगितले आहे.
“राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
भास्कर जाधव यांनी ही आव्हानं द्यायची वेळ नाही असे संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. आव्हान द्यायला पाहिजे, पण सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान द्यायची नाही, तर संवादाची वेळ आहे. आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे. मी तेव्हाही सांगितलं होतं की आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली? भास्कर जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला की भास्करराव जाधव शिवसेनेविरोधात बंड करणार का ? यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, भास्करराव जाधव सध्यातरी आमच्या संपर्कात नाही. त्यामुळे त्यांचा जेव्हा आमच्याची संपर्क होईल. तेव्हा आम्ही तुम्हालां कळवू. एककीकडे शिवसेनेचे एक एक आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन सामील होत आहे. अशातच आता भास्करराव जाधव कुठे आहेत ? असा सवाल केला जात आहे.
Read also:
- “अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील
- निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
- “बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
- ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन
- बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र