बीड : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
शिवीगाळीची व्हायरल ऑडिओ क्लिप माझी नाही, हे विरोधकांचे कटकारस्थान; भाजप आमदाराचे स्पष्टीकरण
या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. कोरोना होता म्हणून यात्रा थांबविली होती. आता कोरोना थोडाफार संपुष्टात आल्यावर यात्रा सुरू झाल्या. परळीत आल्यावर कोरोना संपुष्टात आल्याचे वाटले. माझ्या लग्नाची वरात निघाली नाही, मात्र परळीत वरात पाहिली. असंख्य तरुण धनंजय मुंडेवर प्रेम करतात हे मी आज परळीत पाहिले. हार घालण्याची पद्धत वेगळी होती, बघेल तिथं क्रेनने हार घातले. लोकांचे प्रेम पाहून दहा निवडणुकादेखील मुंडे यांची कोणी थांबवू शकत नाही. परळी फार पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण जोर इथल्या नेत्यात आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
महाराष्ट्रतल्या कुठल्याही नेत्याने घोटाळा केला की त्याचा पर्दाफाश धनंजय मुंडेंनी विरोधी पक्ष नेता असताना केला. बारामती पवारांच्या मागे उभी राहिली म्हणूनच विकास झाला. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुंडे भविष्यकाळात करतील. एक विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे काही नाही, जवळचे लोक दूर गेले की सर्व संपते, धनंजय मुंडेंवर नवी जबाबदारी मिळाली, मला अध्यक्षपदाची धुरा दिली त्यावेळी अनेकांनी पक्ष बदलला होता, मात्र दोन वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती बदलली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
Read Also :
- मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून
- मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
- पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; सुरक्षा अधिकारीही सामील
- मित्राने मित्राचा शब्द पाळला, भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांच्या भावना
- मोठी बातमी: अखेर भाजप- मनसे एकत्र आले; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात फुटला युतीचा नारळ