मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोव्याच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने दिली आहे. याआधी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी मिळाली. तिथं भाजपला यश मिळालं असून आता भाजपनं मिशन गोवा फडणवीसांकडे सोपवलं आहे. यावेळी बेळगाव निवडणूक आणि चिपी विमानतळ उद्घाटनावरून फडणवीस यांनी सेनेवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावण्याची गरज नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समन्वयाने ही गोष्ट व्हायला पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामात राणेंचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवायचे की नाही या प्रश्नाला बगल दिली.
भावना गवळींच्या ट्रस्टशी संबंधित दोघांना ईडीचे समन्स; मागितली १५ दिवसांची वेळ
‘आता चिपी विमानतळ सुरु होणार आहे. अशा परिस्थिती वाद न करता कोकणच्या पर्यटनाला चालणा मिळणार आहे हे महत्त्वाचं. यासाठी राणेंचे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे अभिनंदन’, असे फडणवीस म्हणेल. तसंच यामध्ये श्रेयवादाची कोणती लढाई नसून केंद्राने आणि राज्याने समन्वयाने काम करायचे असते असंही त्यांनी म्हटलं.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
भाजप नेते किरिट सोमय्या यांना केंद्राकडून झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्याला केंद्राकडून सुरक्षा दिली गेली असेल तर त्या सुरक्षे संदर्भात केंद्रीय संस्था आढावा घेत असतात. संबंधित व्यक्तींच्या जीवाला धोका असेल किंवा कमी झाला असेल तर थेट सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी कऱण्याचा निर्णय घेतला जातो. त्याला राजकीय अर्थ देण्याचं कारण नाही अशंही फडणवीसांनी सांगितलं.
Read Also :
- मोठी बातमी! ठाकरे सरकारची पोलखोल करणाऱ्या सोमैय्यांना आता ‘Z’ दर्जाची सुरक्षा
- ‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
- पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
- सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
- राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण