नागपुर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुर येथे सुरू होत आहे. यातच पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते पक्ष कार्यालयावर ताबा सांगतांना दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षात देखील कार्यालयावरून भांडणं सुरू झाली आहेत.
हेही वाचा…“पंकजा मुंडे आणि माझ्यातील राजकीय संघर्ष संपला”, बीडमध्ये धनंजय मुंडेंचं मोठं विधान
नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या निवासासाची सोय करण्यात आली आहे. यातच आता पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन्ही गटात वाद सुरू झाला आहे.
हेही वाचा…“कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात”, भागवत कराडांचं आव्हान फेटाळत खैरेंचा लोकसभेवर दावा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी नागपुर विधिमंडळातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचं कार्यालय अजित पवार गटाचंच असल्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे नेते तिथे आले, तर त्यांना चहा-नाश्ता देऊ अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील दोन गटही कार्यालयांवरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र
हेही वाचा…“मराठे मागास नाहीत, जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा,” गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सरकारला घेरणार,” जयंत पाटलांनी दिल्या सूचना
हेही वाचा…“मंत्रिपदासाठी आता फक्त देवाला कौल लावायचा बाकी राहिलाय”, शिंदेंचा ‘हा’ आमदार अजूनही मंत्रीपदासाठी आतूर