अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन बंड पुकारलं. यातील अनेक जण मंत्रीपदाला लाथ मारून बंडात सहभागी झालेत. यातच नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल या आशेवर सगळेच जण राहिले. मात्र शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ आमदारांना मंत्रिपद मिळालं. दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, तेवढ्यात अजित पवारांनी सत्तेत एंन्ट्री घेतली अन् राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भाजप अन् शिवसेना आमदारांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. यातच सर्वात जास्त चर्चा शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांची झाली. त्यावर आता गोगावले यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका
सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल. मानपान राहिला असेल तर तोही करावा लागेल. असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार आणि पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी केले आहे. ते महाड येथे पत्रकारांशी बोलत होते. यातच मला अजूनही मंत्रिपदाची आशा असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती देखील त्यांनी केलीय.
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी
दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार अद्यापही झाला नाही. यावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पंकजा मुंडे आणि माझ्यातील राजकीय संघर्ष संपला”, बीडमध्ये धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात”, भागवत कराडांचं आव्हान फेटाळत खैरेंचा लोकसभेवर दावा
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना ‘या’ ठिकाणी दाखवले काळे झेंडे, वाद आणखी चिघळणार “?
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन