मुंबई : धारावीचा विकास झालाच पाहिजे, तिथल्या लोकांचे पुनर्वसन झालंच पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे! धारावीचा विकास हा मुंबईच्या भवितव्याचा विषय आहे!बीडीडीचा विकास जसं म्हाडा करत आहे, तसं धारावीचा विकास सरकारने करावा! जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारची असावी, अदानीचा ह्यात फायदा नसावा! शिवसेनेची ताकद, ही प्रशासनात असणं की नसणं ह्यावर अवलंबून नाही. शिवसेनेची ताकद रस्त्यावर उतरून जाब विचारणारी आहे. असं म्हणत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात १६ तारखेला मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान
सब भूमी गोपाल’ की तसं आता ‘सब मुंबई अदानी’ की असं आहे का?नियोजनशून्य विकासकामांमुळे मुंबईचा जीव घुसमटलेला आहे. हे सरकार केवळ कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतंय. जे मुंबईप्रेमी आहेत त्यांनी १६ तारखेला एकत्र या, अदानीला जाब विचारा! मुंबईकडे वाकड्या नजरेने बघाल तर याद राखा!ही मुंबई मराठी माणसाने १९६० साली रक्त सांडून, बलिदान देऊन मिळवलेली आहे; ही आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही आणि आम्ही ती कोणाला आंदण देऊ देणार नाही. असं ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा…अमरावतीत शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, पवार मोर्चात हजर राहणार
पुढे बोलतांना ते म्हणाले की, निवडणूक प्रचारामध्ये देवाच्या, धर्माच्या नावाने मतं मागितली तर तो गुन्हा होतो की नाही? जगातले एकमेव हिंदुहृदयसम्राट ह्यांनी ज्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांच्यावर मतदानाची बंदी घातली होती.निवडणूक आयोगाचं उत्तर आलं नाही, तर आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलून मतं मागणार! असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का
दरम्यान, माझं पुन्हा आव्हान आहे, चार राज्यांचा निवडणुका सोडा. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. दम असेल तर लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या! तुमची लाट आहे आणि ईव्हीएमचा विषय खोटा ठरवण्यासाठी एकदा बॅलेट पेपर निवडणूक घ्या! असं आवाहन देखील ठाकरेंनी दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च