मुंबई : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात २२,७४६ आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमधअये १९,८३४ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमूळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. यावरून शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टिका केली.
हेही वाचा…अमरावतीत शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, पवार मोर्चात हजर राहणार
आत्महत्या नाही, खूनी सरकार अस म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य आणि केंद्रातील सरकारला लोकांना फक्त परिकथामध्ये गुंतवून ठेवायचंय असं दिसतं. ख-या प्रश्नांबाबत कुणालाच बोलायचं नाहीए. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे 2022 सालात महाराष्ट्रातील 22,746 लोकांनी आत्महत्या केल्यात. शरमेची बाब म्हणजे या आकड्यांसह महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात असंही अहवालात म्हटलंय, यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असू शकते. असा घणाघात आव्हाडांनी लगावला.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का
दरम्यान, देशाचे पंतप्रधान काल महाराष्ट्र भूमीत येऊन गेले. भाजपच्या राज्य नेतृत्वाला तर फक्त फोडाफोडीच्या राजकारणात रस आहे. लोकांशी काहीही घेणंदेणं नाही. परंतु देशाच्या पंतप्रधानांनाही छत्रपती शिवरायांच्या राज्यातील जनता आत्महत्या का करत्येय याची दखल घ्यावीशी वाटत नाही. आज महाराज असले असते तर राज्यातील जनतेची हि स्थिती पाहून त्यांची मान देखील शरमेनं खाली गेली असती. अहवालानुसार बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती, दिवाळखोरी, कौटुंबिक समस्या आणि गंभीर आजार या सर्व गोष्टी आत्महत्यांना कारणीभूत आहेत. या समस्यांचा विचार केल्यास सरकारचा नाकर्तेपणा उघड पडतो. म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की या आत्महत्या नाहीत तर हे सरकारने उघडपणे केलेले खून आहेत. अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
आत्महत्या नाही, खूनी सरकार…!!
राज्य आणि केंद्रातील सरकारला लोकांना फक्त परिकथामध्ये गुंतवून ठेवायचंय असं दिसतं. ख-या प्रश्नांबाबत कुणालाच बोलायचं नाहीए. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे 2022 सालात महाराष्ट्रातील 22,746… https://t.co/geKcMN1WyN
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान