बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडलं. यावेळी मुंडे भाऊ बहिण प्रथमच व्यासपीठावर आलेत. तसेच यावेळी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं भरभरून कौतूक केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलतांना आमच्यातील राजकीय संपला असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी
पंकजा मुंडे आणि माझ्या मध्ये जो राजकीय संघर्ष होता, तो आता संपला आहे. राज्यात महायुतीचं सरकार म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर मनभेद कधीही नव्हते परंतु मतभेद आता सरकारमध्ये आल्यानंतर संपले आहेत. राजकारणात त्यावेळेस विचारांच्या विरोधात वेगवेगळे होतो. पण आता हे सर्व एकत्र विचार महायुतीत आल्यानंतर आमच्या भाऊ बहिणीमध्ये अंतर पडायचं काही कारण नाही. या अगोदर देखील आम्ही एका व्यासपीठावर आलो आहोत. जिल्ह्याचं नेतृत्व आज आपल्याला व्यासपीठावर बघायला मिळालं. त्याचा नक्कीच सगळ्यांना आनंद आहे. यातच जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या लोकांना आम्ही एकत्रित राहावं असं वाटतं. असं धनंजय मुंडे म्हणाले.
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला
दरम्यान, बीड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रथमच अनेक विरोधक एकत्र आलेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याला सर्वाधिक निधी दिल्याचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला. तर जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहोत. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात”, भागवत कराडांचं आव्हान फेटाळत खैरेंचा लोकसभेवर दावा
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना ‘या’ ठिकाणी दाखवले काळे झेंडे, वाद आणखी चिघळणार “?
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका