अमरावती : अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या महाराष्ट्रातल्या विविध भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमरावती येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने केलेल्या सर्व घोषणा फसव्या ठरल्या ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरी शोकांतिका आहे. काहीही संकट आलं तरी खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणारे सरकार आज राज्यात नाही हे दुर्दैव आहे. सात तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार करतील. असं जयंत पाटलांनी म्हटलं.
यावेळी नागपूरला होणारे अधिवेशन थोड्या दिवसातच संपवून लोकांच्या प्रश्नांना गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. पूर्वी येथील अधिवेशने महिना महिना चालायची. विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन दोन दिवस चर्चा व्हायच्या. आता कमी दिवसात अधिवेशन आवरतं घेणाऱ्या सरकारकडून विदर्भाला न्याय मिळण्याची आपण काय अपेक्षा करणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. सोयाबीनला किमान ८००० रुपये प्रतिक्विंटल तर कपाशीला १४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा ही आमची मागणी आहे. सरकारी इतकं दुर्लक्ष करत आहे की, बरीचशी कापूस खरेदी केंद्र सुद्धा सुरू केलेली नाहीत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या जीवावर सोडलेलं आहे. पीकविमा विमा कंपन्यांचे देखील अच्छे दिन आले आहेत. असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका
दरम्यान, नांदगावच्या एमआयडीसीत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. एकाबाजूला शहरात मोठे मोठे फ्लाय ओव्हर बांधले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेळघाटातील अविकसित आदिवासी वस्त्यांना जोडणारे अजून रस्ते नाहीत. हा दुराभास पदोपदी जाणवतो. संत्र, केळी यावर बांगलादेशने प्रचंड आयात कर लावलेले आहेत. ते कमी व्हावे त्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही. कांदा निर्यातीवर देखील ४० टक्के कर लावून शेतकऱ्यांची कोंडी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संघटितपणे लढण्याची गरज आहे. असंही ते म्हणाले.
अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या महाराष्ट्रातल्या विविध भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमरावती येथे भव्य आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन… pic.twitter.com/G8HBtcVNUz
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मंत्रिपदासाठी आता फक्त देवाला कौल लावायचा बाकी राहिलाय”, शिंदेंचा ‘हा’ आमदार अजूनही मंत्रीपदासाठी आतूर
हेही वाचा…“पंकजा मुंडे आणि माझ्यातील राजकीय संघर्ष संपला”, बीडमध्ये धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात”, भागवत कराडांचं आव्हान फेटाळत खैरेंचा लोकसभेवर दावा
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना ‘या’ ठिकाणी दाखवले काळे झेंडे, वाद आणखी चिघळणार “?
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर