नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणीत अजित पवार गटाने मृत्यमुखी पडलेल्या लोकांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी मागणी केली आहे.
हेही वाचा…राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी एकनाथ शिंदे सरसावले, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
राष्ट्रवादीच्या निवडणुक चिन्हाच्या लढाईत आता झोमॅटोची ची एन्ट्री झाली आहे. अजित पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलेल्या २० हजार शपथपत्रांचीच तपासणी केली गेली. यामध्ये ८९०० शपथपत्र बोगस सापडले असून अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस शपथपत्रांची विभागणी केली आहे. २४ गटात विभागणी केलेल्या काही शपथपत्रे ही मृतांच्या नावे, काही अल्पवयीन मुलांच्या नावे, काही अस्तित्वात नसलेली पदे तर काही ठिकाणी झोमॅटो सेल्स मॅनेजर म्हणून लिहिले असल्याचा युक्तिवाद आयोगात करण्यात आला आहे.
हेही वाचा…बागेश्वर धामच्या दरबारात नऊ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, कृष्णचा भजन गायल्याने मुलाचा जन्म, मॉं शेरावाली प्रसन्न
मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. शपथ पत्र जर खोटं असेल तर हा गुन्हा आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कोर्टाची अशा प्रकारे दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईत झोमॅटो ची एन्ट्री”,पाहा आज काय काय घडलं ? पुढची सुनावणी कधी ?
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांना पुण्यात दाखवले काळे झेंडे, पोलिसांनी युवकांना घेतले ताब्यात
हेही वाचा…अजित पवार गटाने दाखल केलेल्या शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू, निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार, दिवाळीचा दौराही केला जाहीर
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस