मुंबई : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाकडील वकिलांनी जवळपास अडीच तास युक्तिवाद केला. आता पुढची तारिख २० ऑक्टोबर दिली असून त्यादिवशी सुनावणी होणार आहे. यातच शिंदे गटाकडून फक्त वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप खासदार अनिल देसाई यांनी केला आहे.
हेही वाचा…गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना..! ड्रोनचा वापर, अन् 17 पोलिसांची पथके तैनात, बक्षिसही केले जाहीर
ठाकरे गटाकडून सर्वच आमदारांवरील याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सर्वच याचिकेसाठी वेगवेगळा कायदा असल्याने सर्वच याचिकांवर एकत्रित सुनावणी शक्य नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं आहे. अपात्र करण्यासंदर्भात प्रत्येक आमदाराला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार राहणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल. असंही शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं आहे. तसेच येत्या २० तारखेला निर्णय अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“ब्लॅकेमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण,” चित्रा वाघ यांच्यावर कोणी केली टिका ?
दरम्यान, अपात्रतेसंदर्भात आमच्या बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. यातच एक आमदार सांगतो की मला नोटीस मिळाली तर दुसरा आमदार मला नोटीस मिळाली नसल्याचं सांगत आहे. यातच शिंदे गटाकडून फक्त वेळकाढूपणा केला जात आहे. २० तारखेला आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय लागणार असून सर्व आमदा अपात्र होतील असं अनिल देसाई यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला