पुणे : सध्या राजकीय वातावरणाला पाहून महाराष्ट्रातील सगळीच जनता डिस्टर्ब झाली आहे. अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदार भाजपच्या चिन्हांवर निवडणुक लढायची की काय ? असा विचार करत आहे. त्याचं प्रतिनिधित्व अजितदादांजवळ असलेले काही जण करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छूक आहेत तर काही आमदार लोकसभा निवडणुका झाल्या की पवार साहेबांकडे येण्यासाठी इच्छूक असल्याचं रोहित पवार मोठा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काही काळात काय राजकीय हालचाली होतात. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“इथल्या गद्दाराला आता आडवं करायचंच,” ठाकरेंनी मावळचा उमेदवार घोषित केला, बारणेंचं टेन्शन वाढलं
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चांगले विचार लोकांपर्यंत नेण्याचं काम खासदार अमोल कोल्हे यांनी प्रामाणिकपणे कलाकार म्हणून काम करत आहेत. ते प्रयत्न करत असतांना लोकांचा आवाज देखील संसदेत मांडत आहेत. म्हणे त्यांना सेलेब्रीटी तुम्ही म्हणा, परंतु खासदार जसा असावा तसे ते खासदार आहेत. लोकांचा विश्वास हा डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आहे. त्यामुळे नेत्यांनी बोलून कुणाचीही किमंत होत नसते. लोकांचं त्यांना पाठिंबा देत असतात. असं म्हणत रोहित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या अजित पवारांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
निलेश लंके महाविकास आघाडीकडून निवडणुक लढतील असं बोललं जातंय. त्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, आमदार निलेश लंके यांचा नगरमध्ये एक कार्यक्रम असून कोल्हे त्यांचा अप्रत्यक्षपणे मदतच करीत आहेत. त्यामुळे लंके यांना मदत केली जात असेल तर विचारांना पक्क राहाणं हे पण महत्वाचं आहे. परंतु त्याबाबत आज काही सांगता येणार नाही. हळूहळू सर्वच आमदारांच्या पोस्टरवर शरद पवार यांचे फोटो लागायला लागतील. लोकसभेचे उमेदवार कोण द्यायचे हे सर्व शरद पवार ठरवतील.
दरम्यान, चॅलेंज सर्व ठिकाणी असणार आहे. महाविकास आघाडीचं चॅलेंज असल्यानेच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गेल्या महिन्यात तीन ते चारदा येऊन गेले आहे. अमित शाह सध्या महाराष्ट्रात आले आहेत. यावरून महाराष्ट्राची परिस्थिती भाजपला वाटते तशी सोपी दिसत नाही. त्यामुळेच इतकं काही सुरू आहे. कालच्या बैठकीत फक्त भाजपलाच नेत्यांना बोलवण्यात आलं होतं. कुठल्याही मित्र पक्षांना बोलवण्यात गेलं नव्हतं. यातून एक संदेश दिलं जातंय की, भाजप फक्त ज्यांची ताकद आहे. त्यांनाच जवळ करतेय. जशी ताकद कमी होतंय. त्यांना संपवलं जातंय हे आपण महादेव जानकर यांच्यावरून पाहू शकता. बीडच्या बाबतही यातून दिसत आहे. असेही रोहित पवार यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
हेही वाचा…मावळात अजित पवार गटाला मोठे खिंडार, तब्बल १३७ पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश
हेही वाचा…अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भाजपच्या खासदाराने लोकसभेचे तिकीट केले परत