नाशिक : आताच्या घडीला देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक नजरा या उत्तर प्रदेश आणि गोवा यातील निवडणुकांवर असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकते, या शब्दांत चव्हाण यांनी निशाणा साधला.
हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव; शिवसेना – भाजपात जुंपली
पंतप्रधान मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे. त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली असून, लोकं बेरोजगार झाले आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.
माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करतात, त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत, देशाकडे मोदींचे लक्ष नाही, असा घणाघात करत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. चंद्रकांत पाटील भाजप किती लवकर सत्तेत येते, याची स्वप्न पाहत आहेत, त्यांनी स्वप्न बघत रहावी, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. ते टीव्ही९ शी बोलत होते.
डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे; गोव्यात संजय राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर, गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्यासंदर्भात राजकारण केंद्रीत झाले असून, उमेदवारी नाकारल्याने उत्पल यांच्यासह अनेक भाजप नेते, आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी बंडखोरी करत पक्षाला रामराम केला आहे.
Read also:
- जखमींवर उपचारांसाठी नकार देणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा – देवेंद्र फडणवीस
- मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना; मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत
- नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ च्या भूमिकेत; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
- अमोल कोल्हेंच्या नथूराम गोडसेंवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… निवडणूकी आधीच…
- भाजपला सोडचिठ्ठी देऊन उत्पल पर्रिकरांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पत्र