मुंबई : भाजपला राज्यातील ओबीसी आणि बहुजनांचं नेतृत्व संपवायचं असतं. त्यांचा पक्षात वापर करायचा आणि फेकून द्यायचं, अशी भाजपची वृत्ती आहे. पंकजा मुंडेंचाही अशाच पद्धतीने वापर करून घेतला. पंकजा मुंडे यांनी एकदा मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. असं म्हटलं होतं. हे वाक्य मनुवादी विचारांच्या लोकांना अजितबात पटलं नाही. तेव्हापासून भाजपने पंकजा मुंडेंच खच्चीकरण करायला सुरूवात केली असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला १९ कोटी रूपयांच्या जीएसटी थकबाकीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. हा जीएसटी न भरल्यास कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचंही नोटीशीमध्ये उल्लेख केला आहे. साखर कारखान्यावर केलेले गैरव्यवहार फेटाळून लावत आपला कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असल्याचं मुंडेंनी सांगितलं आहे. त्यावर वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
दरम्यान, आज भाजपात त्यांच्यावर जो अन्याय होत आहे. तो अन्याय संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तो अन्याय किती सहन करायचा आणि पंकजाताईंची सहनशक्ती किती आहे, हे त्यातून दिसलं. परंतु, पंकजा मुंडेंचं नेतृत्व संपवण्यासाठी भाजपाने पद्धतशीरपणे रचना केली आहे. त्याचा पहिला भाग कारखान्यावरील कारवाईचा आहे. असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
भाजपकडून लोकसभेची जंगी तयारी सुरू, अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्रामीण संवाद यात्रा’ काढणार
हेही वाचा…तिजोरीत पैसे नसल्याने ‘या’ जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, राष्ट्रवादीची सरकारवर टिका
हेही वाचा…भाऊ बहिणीच्या मदतीला धावणार, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या भेटीला
हेही वाचा…“आंबेडकरांनी ४८ जागा लढविण्याच्या वल्गना करू नये,” रामदास आठवलेंनी वंचितसोबत दिले युतीचे संकेत
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात दिसेल,” भाजप आमदाराचा मोठा दावा