मुंबई : लोकसभा निवडणुकांना सहा महिन्यांचा कालावधी उरला असल्याने भाजपने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप सरकार पुरेपूर प्रयत्न करतांना दिसत आहेत. याच दरम्यान भाजप ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
निवडणुकांच्या पुर्वी संपूर्ण देशभरात भाजपकडून ग्रामीण संवाद यात्रा काढणार आहे. याच दरम्यान भाजप सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि केंद्र सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी नव्या लाभार्थ्यांची नोंदणी करणे या यात्रेसाठी १५०० रथ तयार करण्यात येणार आहेत. यासह जीपीएस आणि ड्रोनही असणार असून हे दीड हजार रथ देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये जाणार असल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेमच्या हाती लागली आहे.
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
संवाद यात्रा दोन महिने चालणार असून यात्रेच्या शुभारंभाची तारिख अजून फिक्स झाली नाही. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात यात्रेची सुरूवात झाली होणार असून पंतप्रधान कार्यालय आणि महत्वाच्या योजनांशी संबंधित मंत्रालयाकडून या यात्रेची रूपरेषा तयार केली जाणार आहे. यामध्ये पीएम किसान, पीएम मुद्रा योजना, पीएम जन धन योजना, पीएम आवास योजना आणि नुकतीच जाहीर झालेली पीएम विश्वकर्मा योजनांच्या जाहिरातींवर विशेष लक्ष देण्यात येईल.
READ ALSO :
हेही वाचा…तिजोरीत पैसे नसल्याने ‘या’ जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, राष्ट्रवादीची सरकारवर टिका
हेही वाचा…भाऊ बहिणीच्या मदतीला धावणार, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या भेटीला
हेही वाचा…“आंबेडकरांनी ४८ जागा लढविण्याच्या वल्गना करू नये,” रामदास आठवलेंनी वंचितसोबत दिले युतीचे संकेत
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात दिसेल,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?” महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात! ठाकरे गटाची टिका