बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा जवळपास 40 दिवसानंतर विस्तार करण्यात आला. यामध्ये भाजपला आणि शिंदे गटाला प्रत्येकी नऊ मंत्रीपद देण्यात आलं. तसेच यामध्ये अपक्ष आणि महिला आमदारांना डावलल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रखर शब्दात टिका केली. यातच आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मंत्रिपदावरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
“भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
पंकजा मुंडे या महादेव जानकर यांना राखी बांधायला आल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं. त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांना समाधान करावं अशा शुभेच्या मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेल्या आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे. मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
“मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझं सांगणं आहे की महिला म्हणजे बालकल्याण,एखादा मुस्लिम बांधव म्हणजे, अल्पसंख्यांक, आदिवासी भागातून म्हटल्यावर आदिवासी विकास, शेड्युल कास्ट म्हणजे शेड्युल खात असं करू नये. तसेच मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळात मी महिला असूनही मला ग्रामविकास खातं मिळालं होतं. अशा रितीनेच महिलांना संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
“दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यानंतर पंकजा मुंडे या सतत या ना त्या कारणांने राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिल्या. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी देखील पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांना मागील एकाही निवडणुकीत संधी मिळाली नाही.
Read also
- लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
- “फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”