मुंबई : मराठा आरक्षणापाठोपाठ आता राज्यात इतर आरक्षणाच्या मुद्यावरून देखील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे.
मुंबईत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत चर्चा झाली. राज्यात 2017 पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरु आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटं बोलण्याचं काम करतंय. महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, याआधी देखील नाना पटोलेंनी या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये, अशी टीका त्यांनी केली होती.
Read Also :
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत, परिवहनमंत्र्यांची घोषणा
- ‘लोक मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात, शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली’
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा
- ‘मराठा आरक्षण आंदोलनात खासदार उदयनराजेंची पुढाकार घेण्याची तयारी’
- ‘चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही’