मुंबई : अतुल भातखळकर हे माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केला होता. आता राज ठाकरेंचा हा दावा भाजप नेते अतुल भातखळकरांनी फेटाळून लावला आहे.
गौप्यस्फोट करण्यासाठी माझा असा चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, एवढंच मी सांगेन, असे म्हणत भातखळकरांनी राज ठाकरेंना उत्तर दिले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.
राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य असल्याचे सांगतानाच भातखळकर म्हणाले की, यापूर्वीसुद्धा त्यांनी असे अनेक आरोप केले आहेत. पण मी त्यांच्याकडे कायम त्याकडे दुर्लक्ष केलं. 2009 च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना 2021 ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय.
मी भारतीय जनता पार्टीत होतो, आहे आणि कायम राहीन. माझ्या दृष्टीने पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं आणि आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतोय, असे म्हणतानाच त्यांनी राज ठाकरेंचा दावा फेटाळून लावला.
Read Also :
- लसीकरणातील अडचण दूर व्हावी यासाठी शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार
- ‘जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच’
- अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?, ‘त्या’ रिसॉर्टची चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- ‘दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला ‘हे’ रिटर्न गिफ्ट दिले आहे’
- ‘…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर मनसेचे तिकीट मागायला आले होते’