मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली असून, कोरोनाच्या संकटामुळे भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षांतील विकास दर उणे 7.3 टक्के नोंदवला गेला. यावरून आता विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे.
जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो,त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच, अशी टीका काँग्रेसनेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
ज्या देशात रघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरवलं जातं,
जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो,
त्या देशाचा जीडीपी वजा ७.३ जाणारच!
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 1, 2021
नितीन राऊत ट्विट करत म्हणाले की, ज्या देशात रघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरवलं जातं. जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा ७.३ जाणारच!, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील जीडीपीवरून मोदी सरकारवर टीका केली. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
Read Also :
- अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?, ‘त्या’ रिसॉर्टची चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- ‘दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला ‘हे’ रिटर्न गिफ्ट दिले आहे’
- ‘…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर मनसेचे तिकीट मागायला आले होते’
- ‘मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर या’
- ‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला