दिल्ली : सोमवारी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दुसरी भेट झाली, यांनतर देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आणि राज्यातल्या राजकीय घडामोडींना देखील वेग आला. यांनतर राज्यात भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, नंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक झाली. यांनतर मंगळवारी शरद पवारांनी ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली १५-२० भाजपविरोधी पक्षांची बैठक बोलावली. याआधी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही एक महत्वाची बैठक पार पडली. त्यामुळे, या सलग बैठकीच्या सत्रांनंतर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात लवकरच काहीतरी नवीन घडणार, अश्या चर्चा केल्या जाऊ लागल्या.
हे पण वाचा, देशात मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी होणार का? बाहेर आलं स्पष्टीकरण
त्याप्रमाणे, काल ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना, ‘राष्ट्रमंच’चे नेते माजिद मेमन यांनी, “शरद पवारांनी ही बैठक बोलावली नसून, ती त्यांच्या निवासस्थानी झाली आहे. ‘राष्ट्रमंच’ च्या समविचारी पक्षांशी चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. यात काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा, मनोज तिवारी, कपिल सिब्बल, सिंघवी या नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं. मात्र काही कारणाने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे, काँग्रेसला यातून वगळण्यात आलेलं आहे, या बाहेर सुरु असलेल्या चर्चांना काही अर्थ नाही. या बैठकीत देशातील राजकीय, सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. या बैठकीत केवळ राजकीय नेतेच नव्हते, विविध क्षेत्रातील दिग्गज होते. त्यामुळे केवळ राजकीय रुप देणं योग्य नाही” असं स्पष्ट केलं.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
तसेच, “समाजवादी पक्षाचे नेते आणि राष्ट्रमंचचे संस्थापक सदस्य घनश्याम तिवारी यांनी, “देशात अलटर्नेट व्हिजन तयार करणं गरजेचं आहे. आज बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. यशवंत सिन्हा यादृष्टीने एक टीम तयार करतील. ती टीम देशाला एक व्हिजन देत राहील. यात देशातील सर्व स्तरातील सामान्य लोकांचा समावेश असेल. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकरी, इंधन, केंद्र-राज्य संबंधं इ. अनेक मुद्द्यांवर ही टीम काम करेल,” असं सांगितलं. यानंतर, आता पुन्हा एकदा पवार-प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली असू, गेल्या ४८ तासांतील ही दुसरी भेट आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षण रद्द केलेल्या ५ जिल्हा परिषदा, ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
दरम्यान, काल झालेल्या बैठकीत, भाजप पक्षातून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के. टी. एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच, या राजकीय नेत्यांव्यतिरिक्त या बैठकीमध्ये लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमधील भारताचे निवृत्त राजदूत के. सी. सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितिश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित होते.
Read Also :
- ओबीसी समाजावरील अन्याय थांबवून निवडणूका रद्द करा, अन्यथा….; फडणवीस आक्रमक
- “लहान मुलांचा अभ्यास झाला नसेल, तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतंच”
- “भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही”-नाना पटोले
- शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला
- काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही – नाना पटोले