नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसापासून केंद्रीय तपास यंत्रणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांव सध्या केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. आता यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार यांनी लोकसभेत यांवरून विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी काळ्या पैशाच्या मुद्यावरून मोदी सरकारवर तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोचक शब्दात टिप्पणी केली.
अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निश्चिलनीकरण आणि काळ्या पैशाच्या मुद्यावर बरचं बोललं जातंय. निश्चलनीकरण का करण्यात आलं. तुम्ही म्हणाले काळा पैसा परत येईल. निश्चलनीकरणामुळे किती पैसा परत आला हे भागवत कराड यांनी सांगाव. मी आता 15 लाख रूपयांचा हिशोब पण विचारत नाही. बिचारे अमित शाह खरे निघाले. त्यासाठी मला अमित शाह यांचा आदर वाटतो. ते टिव्हीवर खुप चांगलं बोलता. ते म्हणाले हा तर जुमला आहे. ते प्रमाणिकपणे बोलले. मला प्रमाणिक माणसं आवडतात. असा टोला देखील त्यांनी लगावला.
उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय कधीतरी भरून निघेल; खडसेंचा फडणवीसांवर रोष
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही म्हणता की, सीबीआय, ईडी, आयकर विभाग या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटवर कोणावर धाड पडणार हे 4 ते 5 दिवस आधीच कसं समजतंय. एखादा नेता 15 दिवसात तुरूंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणार आहेत का ? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे आधीच कसं माहिती होतं.
सोमय्यांचा महाविकास आघाडीवर हातोडा; अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत
दरम्यान, आमच्याकडून काही चूक झाली तर मला फाशी द्या, याठिकाणी नाही. तर भर चौकात फाशी द्या. आमची चुक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य़ खुप कलाटण्या देतं आहे. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल. परंंतु म्हणून आम्हाला फाशावर देणार का ? पारदर्शक काम करा आणि न्याय करा, अशी मागणी देखील त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
Read also:
- दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
- नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
- कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
- आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- “वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस