मुंबई : कोणतीही निवडणूक असते तेव्हा काही वॉर्ड हे विशिष्ट जातीच्या उमेदरावारांसाठी राखीव असतात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील तसं असतं. पण काही उमेदवार बोगस कागदपत्रे मिळवत आपण त्याच जातीचं असल्याचं सांगत उमेदवारी लढवतात. पण अशा नगरसेवकांचं पितळ नंतर पडतातळणीत उघड पडतं. याशिवाय अनेक कारणास्तव हे नगरसेवक अपात्र ठरु शकतात. संबंधित व्यक्ती अपात्र ठरल्याने त्याला देण्यात आलेला पगार, भत्ता हे महापालिकेने परत घेणे अपेक्षित असते. मात्र, मुंबई महापालिकेने अशा १२ अपात्र नगरसेवकांकडून जवळपास ४० लाख रुपये वसूल केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी भाजप याहीवेळी आपटणार तोंडावर; जनहित याचिका खर्चाच्या अंमलबजापणीचे अधिकार आयुक्तांकडे
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या चिटणीस खात्यास पत्रव्यवहार करुन याबाबतची माहिती मागवली होती. नगरसेवक पद अपात्र ठरल्यानंतर १२ नगरसेवकांकडून वेतन आणि भत्ता पायी अदा केलेले पैसे वसूल केले का? किंवा त्यांना किती रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती गलगली यांनी मागवली होती. त्यानंतर महापालिकेच्या चिटणीस खात्याने त्याला उत्तर देत अपात्र १२ नगरसेवकांना ३९ लाख ९५ हजार ८३३ रुपये दिल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे ३, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आणि अपक्ष २ नगरसेवक आहेत.
पुणे महापालिकेतल्या भाजपची जनतेच्या पैशांवर फुकट फौजदारी; जनहित याचिका खर्चाला स्थायीची मंजूरी
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की ज्या नगरसेवकांचे पद निर्रह (अपात्र) झाले त्यांच्याकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे का? चिटणीस खात्याने माहिती अधिकार अंतर्गत दिलेल्या माहितीत २४ नगरसेवकांची यादी दिली ज्यांचे पद विविध कारणांसाठी निर्रह झाले आहेत. यात १२ नगरसेवकांनी ३९ लाख ९५ हजार ८३३ रुपये परत केलेले नाहीत. तर ९ नगरसेवकांनी तत्काळ रक्कम अदा केली आहे. ३ असे नगरसेवक आहेत जे ज्यांस निर्रह ठरल्यानंतर कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही.
Read Also :
- राज्यात तोंड उघडणारे दानवे-राणे, मराठा आरक्षणावर संसदेत तोंड का उघडत नाहीत? राऊतांचा संतप्त सवाल
- हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा
- मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
- प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- चोरीच करायचीय तर स्वखर्चाने तरी करा, ती पण जनतेच्या पैशांनी करताय? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला